रयत शिक्षण
संस्थेची सक्षम माऊली लक्ष्मीबाई भाऊराव पाटील
कर्मवीर डॉ.
भाऊराव पाटील यांच्या सामाजिक कार्यात त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाई यांचेही
योगदान अत्यंत मोलाचे आहे. म. जोतीराव फुले यांना सावित्रीमाई फुले यांनी जशी साथ
दिली,
त्यांच्या
कार्यांत हातभार लावला त्याचप्रमाणे लक्ष्मीबाई यांनी केलेले कार्य त्याच
तोलामोलाचे आहे.
लक्ष्मीबाई
यांचा जन्म ७ जून १८९४ रोजी कुंभोज, जि. कोल्हापूर येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव अण्णा पाटील होते.
कर्मवीर भाऊरावांचा जन्मही याच गावी त्यांच्या आजोळी झाला. कुंभोज हे समृध्द
गाव होते. गावातील जैन समाज मात्र पारंपारिक कर्मठ होता. त्यामुळे लक्ष्मीबाईच्या
मनावर कर्मठपणाचे संस्कार बालपणापासूनच द्दढ झालेले होते. लक्ष्मीबाई व
भाऊरावांचे लग्न सन १९०९ मध्ये कुंभोज येथे झाले.
किर्लोस्करवाडीलाभाऊरावांकडेदहाबारामाणसांचेएकत्रकुटुंब होते.यासर्व कुटुंबाचेकामलक्ष्मीबाईस्वतः करीत.याशिवाय घरी येणारे – जाणारेपाहुणेयांचेही आदरतिथ्य त्याचकरीत. त्यामुळेचकिर्लोस्करकारखान्याचे मालकलक्ष्मणरावकिर्लोस्करनेहमीम्हणत असत , "गृहलक्ष्मीअसावी तर लक्ष्मीबाई पाटील यांच्यासारखी ” भाऊरावाच्या आई गंगाबार्इ यांच्यामुशीतून लक्ष्मीबाईजडणघडण झाली होती.
किर्लोस्कावाडीला
राहत असतानालक्ष्मीबाईचा
कर्मठपणा नैसर्गीकरित्याअठरा पगडाजातीच्या बायकांमुळेकमीझाला.याचा काळातभाऊरांव सत्यशोधकसमाजाचेकार्य करीत असल्यामुळेसर्वजाती- धर्मांचे लोक त्यांच्याकडेयेत असत. त्यामुळे लक्ष्मीबाईनासोवळे ओवळे कठीण जाऊ लागले व हळूहळू त्यांची
कर्मठपणाची मानसिकता कमी होऊलागली. याकाळातचत्यांना १९१७मध्ये आप्पासाहेब व १९१९मध्ये शंकुतलाअशी दोन अपत्ये झाली.
करवीर नगरीत
सत्यशोधकसमाजाचेआधारस्तंभ राजर्षी शाहू महाराज होते. त्यांनी
आपल्यासंस्थानात
प्रजेचा कायापालट घडवून आणण्यासाठी सत्यशोधकचळवळीच्या विचाराचे लोक खेडोपाडी पसरवले
होते. कर्मवीरअण्णा तरराजर्षी शाहूमहाराजांच्या तालमीतच तयार झाले होते त्यांनी
सातारा या क्रांतीकारकांच्या जिल्ह्यातसत्यशोधक चळवळीचा प्रसार आणि प्रचार केला.
सत्यशोधकसमाजाच्या
विचाराने भारावलेलीएक पिढी त्यांनीघडविली. जेव्हासातारा जिल्ह्यात सत्यशोधकसमाजानेलोकजागृतीसाठीजलसे काढलेतेव्हा भाऊरावांनी डफ वाजवण्यासाठीमागेपुढेहीपाहिले नाही. सन १९१९ साली सातारा
जिल्ह्यातील काले नावाच्या एका खेडयात सत्यशोधक समाजाचे अधिवेशनघेतले होते. या अधिवेशनाच्या विचारपीठावरकर्मवीर भाऊराव पाटील यांनी ग्रामीण जनतेच्या
शिक्षणासाठीएक खाससंस्थाकाढण्याचीकल्पनामांडली आणि ठराव रुपाने त्या अधिवेशनात
त्यासमान्यता मिळाली.
अशा रितीने रयत शिक्षणसंस्थेचे बीज सत्यशोधकसमाजाच्या
विचारपीठावर रोवले गेले.वृक्षाखालीगौतमबुध्दांनाज्ञानप्राप्त झाले.बहुजनहिताय ! बहुजनसुखाय !! हे गौतमबुध्दांचे संदेश आहे म्हणूनसंस्थचे बोधिचिन्ह वटवृक्ष आहे.
१९१९मध्येरयतशिक्षण संस्थेचीस्थापनाकाले, जिल्हासातारायेथे करुनभाऊरावांनी तळागाळातीलबहुजन समाजालाशिक्षणाचीसंधी करुनदिली . सर्वप्रथमएक वसतिगृह काढूनत्यातं सर्व जातीधर्माच्यामुलांना प्रवेश दिला. सन १९२४ मध्ये
सातारा येथे जिल्ह्याच्या ठिकाणीसंस्थेचे स्थलांतरकरण्यात आले. सोमवार पेठेत स्वत :च्या
राहत्या घरीच मोहिते नावाच्या दलित विदयार्थ्यालाठेवूनवसतिगृह सुरु केले . परंतु हा मुलगा जास्त
दिवस राहिला नाही.त्यानंतर
पहिल्यावर्षीचारमुले वस्तीगृहातदाखल झाली. वसतिगृह घरातच असल्यामुळेसर्व मुलांचा स्वयंपाक लक्ष्मीबाईना करावालागे.
सन १९२६ मध्ये
लक्ष्मीबाईना बेबी हे तिसरे अपत्य झाले . बेबी ही वसतिगृहात जात येत असे.
वसतिगृहातील मुले स्वयंपाक हाताने करत असतमुलांनीभाकरीकेली की बेबीखाण्यासाठीजातअसे. भाकरीखात खात घरी गेली कीभाकरी लक्ष्मीबाईच्या भाकरीच्या टोपलीत टाकी.
त्यावेळीत्या तिला
रागावत असत. पण बेबीवर त्याचा काहीही परिणाम होत नसे. तेव्हा त्यांना सोवळे पाळणेकठीणजाऊलागले हळूहळू त्यांच्या स्वभावामध्ये बदल होऊ
लागला व त्या वसगिृहातील मुलांशी एकरुप झाल्या.
२५ फ्रेबुवारी
१९२७ रोजी वसतिगृहाला म. गांधीजीच्या हस्ते ‘ श्रीछत्रपती शाहूबोर्डिंग हाऊस’ नाव देण्यात आले. त्याच वर्षीधनीणीचीबागबोर्डिंगसाठी खंडाने घेण्यात आली. भाऊरावमहिन्यातील पंधरा- वीस दिवस बोर्डिंगच्या व
इतर सार्वजनिक कामासाठीफिरतीवर जायचे
अशा वेळीबोर्डिंगची सर्व
जबाबदारीलक्ष्मीबाईवर
येऊन पडत असे. तेव्हा त्या वसतिगृहातील प्रौढ मुलांच्या सहकार्याने संपूर्णवसतिगृहाची देखरेख करीत असत . बोर्डिंगमधील
भोजन व शेती संबधी सर्व कामावर लक्ष ठेवीत. मुलांचा स्वयंपाक वेळेवर व्हावा
विद्यार्थ्यांनी जेवण करुन आपापल्या शाळेत वेळेवर जावे याची त्या दक्षता घेत
. त्याखेरीज बाजारहाटशेतीला पाणीदेणे मालविक्रीयावरहीलक्षठेवीत असत. मुलांचे जेवणझाल्यावरच त्या स्वत:चे जेवण घेत.
एकदालक्ष्मीबाईची दाढ खूप दुखत होती सातारायेथीलऔषधोपचारने बरे न वाटल्यामुळे भाऊरावांनी
त्यांना ओळखीच्या डॉक्टरांकडे पुण्याला पाठविले. त्यांच्याबरोबर आप्पालाल शेख या
वसतिगृहातील विद्यार्थ्यांबरोबर थोडा शिधादिली, ते दोघेबादल नावाच्या वसतिगृहातील माजी
विद्यार्थ्याच्याघरीथांबले. लक्ष्मीबाईना दाढदुखाचा त्रास जास्त
होत असल्यामुळे त्यांना स्वत: स्वयंपाक करता येत नव्हता व त्या सोवळे पाळतअसल्यामुळे खाणावळीत किंवा हॉटेलमध्ये जेवण
घेणे त्यांनाअशक्य होते.
तेव्हा शेख या विद्याथ्यानेत्यांना पिठल भात करुन खाऊ घातला तो त्यांनी आनंदानेखाल्ला. कुणाच्या हातचे अन्न न खाणार्या
लक्ष्मीबाईनी एका मुस्लिमविद्यार्थ्याच्या
हात जेवण खाल्ले. त्यामुळेत्यांचे सोवळे
पार गळून पडले. त्या वसतिगृहाकडे जातीनेलक्ष देऊ लागल्या. वसतिगृह
पाहण्यासाठी बाहेरचे पाहूणेआल्यास ,त्यांना संपू्र्ण वसतिगृहाची माहिती देऊलागल्या. जर पाहुण्यांनी त्यांना विचारले, तुम्हाला मुलेकिती ? मला पन्नासमुले आहेत . अशा
त्या सांगू लागल्या. वसतिगृहातील मुले व स्वत:ची मुले यांच्यात त्या फरक मानत नसत
वसतिगृहातील मुलांच्या त्यामाताबनल्या होत्या
वसतिगृह हेच एक त्यांचे कुटुंब झाल्यामुळे व्यक्तिगतकौटुंबिक जीवन त्यांना राहिले नव्हते.
सन १९३० च्या
मकर संक्रातीच्या सणाच्या वेळी वसतिगृहात फारचबिकट परिस्थ्िाती निर्माण झाली.वसतिगृहातीलसर्वधान्य संपले होते. पैसाहीशिल्लकनव्हता. पूर्वीची उधारीराहिल्यामुळेव्यापारी उधारधान्यदेण्यास तयार नव्हता. भाऊरावदेणग्या जमाकरण्यासाठी बाहेरगावीगेले होते. वसतिगृहातील सेक्रेटरीनेलक्ष्मीबाईना ही हकिगतसांगितली . अशा वेळी काय करावे हे त्यांना
सुचत नव्हते. आतापर्यंत वसतिगृहाच्या अडीअडचणीला लक्ष्मीबाईच्या अंगावरील
जवळपास ६०तोळ्यांचेसोन्याचे दागिनेविकले गेले हाते. आताविकण्यासाठीकाहीही शिल्लकनव्हतेत्याचवेळी त्यांचे लक्ष गळ्यातील मंगळसूत्राकडेगेले . क्षणभर मनाची घालमेल झाली . लगेच
आपल्यासौभाग्याचे
लेणें असलेले मंगळसूत्र काढूनत्याला तेगहाण ठेवुनपैसे आणण्याससांगितले अशाप्रकारेवसतिगृहातील मुलांची खाण्यापिण्याचीअडचण त्यांनी दुरकेली ते गहाण ठेवलेले मंगळसूत्र नंतरसोडविता न आल्यामुळेविकून टाकावे लागले.
लक्ष्मीबाईनी
रयत शिक्षणसंस्थेच्याजडणघडणीततनमनधनअर्पण केले.म्हणूनत्यांच्या परिसस्पर्शानेरयत शिक्षणसंस्थेचे सोने झाले.इ . स . १९३० सालीलक्ष्मीबाईचेनिधनझाले पणत्यांनीमरणोत्तरआपली व्यक्त केलेलीइच्छाम्हणजेबोर्डींगमध्येसर्व जाती जमातीच्या विद्यार्थ्यांना प्रवेशअसावाव दुसऱ्या दिवशी पाडव्याचे जेवण सर्वांनी घ्यावे . यात्यांच्या विचारावरुनत्यांच्यातीलदूरदृष्टी व समाजहिताची सदोदीत घेतलेली काळजी
याची ग्वाही पटते. लक्ष्मीबाईंचा आदर्श व कृती ही भारतीय स्त्रिायांना आजही
प्रेरणा देणारी घटना आहे. त्याची आठवण म्हणून पुढे सौ. लक्ष्मीबाई पाटीलमेमोरिअलएज्युकेशनफंडहा उपक्रमसुरुकरण्यातआला. आजया फंडातूनगरीब होतकरु आणि गरजू विद्यार्थांनाकर्जरुपानेशिक्षणासाठीअर्थसहाय्य करण्यातयेते.याचाफायदा हजारो विद्यार्थी आज घेत आहेत.
अण्णा आणि
त्यांच्या पत्नी लक्ष्मीबाईयांनीविद्यार्थ्यावर
स्वत:च्यामुलाप्रमाणेप्रेमकेले. श्रीमंतजैनघराण्यातूनआलेल्या लक्ष्मीबाईनी आपले साठ (६०) तोळ्याचे
दागिनेगरीबअस्पृश्य विद्यार्थ्यांच्या
पालनपोषणासाठीखर्च केले. मी
चालले . या मुलांनासोडूनकुठेही जाऊ नकाउद्यापाडव्याचासण आहे मी गेले तरी सर्वांनाजेऊघालाआणिबोर्डिंगचेहे रोपटे मरु देऊ नका हे त्यांनी सन १९३०
मध्ये मरण्यापूर्वीकाढलेले अखेरचे
शब्द होते.
सन १९४८ मध्ये एका समारंभातभाऊरावम्हणालेहोते. ‘मी सर्वाच ऋण फेडीतआलो परंतु माझ्या पत्नीचेऋण मलाआजतागायतफेडीतआलेले नाही.खरोखरच लक्ष्मीबाईनीजो त्यागकेलाजे समर्पणकेले त्याचे ऋणकर्मवीरडॉ. भाऊरावांप्रमाणेचकोणत्याही भारतीय व्यक्तीलाफेडतायेणार नाही.
महत्त्वाची माहिती सर
ReplyDeleteEnglish madhey ahe ka
ReplyDeleteकवता
ReplyDeleteBut I have त्याग रयत माउलीचा speech
ReplyDeleteKavita aahe k
ReplyDelete��������
ReplyDeleteआपण सर्वजन माऊलीच्या ऋणातच आहोत
ReplyDeleteत्यागाची ही प्रेरणा आपणही पूढे सुरु ठेवूया